• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, January 25, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

कोट्यवधींचा चुराडा तरीही 55 गावे तहानलेली

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
December 26, 2018
in बातम्या
0
कोट्यवधींचा चुराडा तरीही 55 गावे तहानलेली
Share on FacebookShare on WhatsApp

गंगापूर तालुक्यातील भयावह परिस्थिती
आता ‘एक लढा जलक्रांतीचा’
संतोष जाधव छेडणार महा जनआंदोलन
नांदूर मधमेश्‍वर कालव्याचे पाणी देण्याची मागणी
गंगापूर / प्रतिनिधी
गंगापूर तालुक्यातील लासूरस्टेशन परिसरात असलेल्या 55 गावांची तहान भागावी या उद्देशाने शासनाने अनेक योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधींचा चुराडा केला आहे, मात्र प्रशासकीय पातळीवर नियोजनाचा अभाव आणि अधिकार्‍यांची उदासिनता यामुळे या गावातील नागरिकांची तहान भागवणे कठीण झाले आहे. अशी भयावह परिस्थिती गेल्या दशकापासून असून प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी आपल्या हिताचे सोन्याचे अंडे देणारे टँकर सुरू करून मलमपट्टी करत आहे. हा प्रकार थांबवून या 55 गावांची तहान भागविण्यासाठी आता जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांनी परिसरात नांदूर मधमेश्‍वर कालव्यातील पाणी देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी लवकरच ‘एक लढा जलक्रांतीचा’ या माध्यमातून महा जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

गंगापूर, वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शिल्‍लेगाव परिसरात असलेले नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी त्रस्त आहेत. हा परिसर गेल्या 10 वर्षांपासून सलग दुष्काळी छायेत असून शेतीचे सिंचन तर कोसो दूर राहिले असून उलट सर्व नागरिकांना आपला जीव, पशूधन वाचविण्यासाठी पाण्याच्या शोधात दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. या भागात निसर्गाची कायमच अवकृपा होत असल्याने शासनाने देखील उपाययोजन केल्या आहेत. त्यात या गावांसाठी वरदान ठरलेल्या शिवना नदीवर 7 कोल्हापुरी व सिमेंट बंधारे, मार्तंडी नदीवर सलग 35 साखळी सिमेंट बंधारे, नारळी नदीवर 6 कोल्हापुरी व सिमेंट बंधारे यासह शिल्‍लेगाव-शिरेगाव मध्यम प्रकल्प, गवळीशिवरा पाझर तलाव, गोळेगाव पाझर तलाव यासह विविध गावात छोटे-मोठे साठवण तलाव यांचा समावेश आहे. यासाठी शासनाने एकूण 431 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल, मुख्यमंत्री पेयजल, वित्त आयोगासह विविध योजना अंतर्गत 133 कोटी रुपये खर्च केले, मात्र करोडो रूपयांचा चुराडा करूनही आज घडीला निर्माण केलेल्या या योजना पूर्णतः बंद आहेत. या टंचाईग्रस्त 55 गावात गेल्या 10 वर्षांपासून तात्पुरत्या स्वरुपात टंचाई अंतर्गत पाण्याचे टँकर कायमस्वरूपी सुरु असून त्याचा मार्च 2018 पर्यंत गेल्या 10 वर्षातील खर्च तब्बल 281 कोटी 74 लक्ष रुपये झालेला आहे. शिवाय याच कालवधीत या 55 गावातील बंद पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल एकूण 9 कोटी 14 लक्ष 63 हजार इतके आहे. गेल्या दशकभरात केवळ पाण्यावर एकूण 854 कोटी 88 लक्ष 63 हजार रुपये खर्च करून देखील अद्यापही या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची शाश्‍वत व्यवस्था नाही. यावर गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नांदूर मधमेश्‍वर कालव्याची लांबी वाढवून शिल्‍लेगाव मध्यम प्रकल्प तसेच वेगवेगळ्या नद्यांवरील कोल्हापुरी, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव आदी जलसाठ्यात पाणी सोडण्यात यावे तसेच संबंधितास तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची व जनावरांची होणारी भटकंती थांबवावी अशी मागणी जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांनी केली आहे. अन्यथा एक लढा जलक्रांतीचा या माध्यमातून 55 गावांतील नागरिकांच्यावतीने रस्त्यावर उतरून ‘महा जनआंदोलन’ करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री बबनराव लोणीकर, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आदींकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

या गावांचा घसा पडला कोरडा
हर्सूल, अनंतपूर, सावंगी, देवळी, खडकनाराळा, सुलतानाबाद, आरापूर, वसुसायगाव, महम्मद्पूर, हनुमाननगर, चिंचखेडा, आगाठान, शिरेगाव, मंजरपूर, शिल्‍लेगाव, गवळीशिवरा, प्रतापपूरवाडी, फुलशिवरा, महेबुबखेडा, भागाठाण, काटेपिंपळगाव, शंकरपूर, बुट्टेवाडगाव, गोळेगाव, देरडा, गवळीधानोरा, सिंगपूर, गाजगाव, खादगाव, शेकटा, वजनापूर, शिरेसायगाव, गोपाळवाडी, रोटस्थळ, खडक वाघलगाव, झोडेगाव, खोपेश्‍वर, बोलठाण, वडाळी, सिद्धनाथ वाडगाव, शहापूर, पळसगाव, येसगाव, डोमेगाव, घोडेगाव, तांदुळवाडी, उत्तरवाडी, मेंढी, म्हसा, भालगाव, हदियाबाद, मालूंजा, कोळघर, कणकोरी अशी 55 गावे आजघडीला तहानलेली आहेत.

 

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Thousands still suffer thundering 55 villagesकोट्यवधींचा चुराडा तरीही 55 गावे तहानलेली
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In