बेंगलुरु:भारतातल्या 8 राज्यातुन आलेल्या 2000 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु येथील प्राचीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या “स्वदेशी बियाणे महोत्सवात” भाग घेतला. देशी बियाण्यांचे प्रकार तसेच देशी बियाणे वाढवण्याचा व्यवसाय हा कसा फायदेशीर ठरू शकतो, ह्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता, एकाच मंचावर सर्वजण एकत्रित होऊन संकरीत बियाण्यांच्या एकाधिकारावर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी ह्या महोत्सवात भाग घेतला.
सेंटरचे संस्थापक तसेच जागतिक अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर ह्यानी स्वदेशी बियाणे महोत्सवाच्या प्रदर्शनिला आपले आशिर्वाद दिलेत. ह्या प्रसंगी इतर मान्यवर शेतकरी जसे श्री भीम सिंग, ज्याना माननीय प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते कृषी उन्नती अवार्ड प्राप्त झाला.
कृषी हा मानवीय अस्तित्वाचा कणा आहे.आम्ही शेतकऱ्यांना स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करण्याकरिता मदत करीत आहोत, ह्या प्रसंगी श्री रवि शंकर म्हणात होते. स्वदेशी बियाणे महोत्सवात भाग घेण्याकरिता आलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी स्वागत करताना श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे अध्यक्ष श्री. राम कृष्णा रेड्डी म्हणालेत, आम्ही हा बियाणे महोत्सव बियाण्यांची देवाणघेवाण आणि त्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता विशेषतः शेतकऱ्यांसाठी आयोजित केला.
सध्याच्या परिस्थीत शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेला पेरणी करत असताना बियाणे खरेदी करण्याकरिता पैसे मोजावे लागतात (ज्यात अधिकतर संकरीत बियाणे असतात) शेतकऱ्यांना ह्या चक्रातून मुक्त करण्याकरिता स्वदेशी बियाणे वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीकडे वळण्यासाठी आम्ही प्रस्ताव देत आहोत. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्याना प्रोत्साहन देण्याकरिता स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून आपसात व्यापार करण्याकरिता आम्ही त्याना प्रशिक्षण देत आहोत. स्वदेशी गाईचे तसेच स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून त्यांचे संरक्षण करणे आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्यांला आनंदी, सुखी आणि समृद्ध करणे हे गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांचे लक्ष आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आणि खरीप हंगामात स्वदेशी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजी तर्फे हा स्वदेशी बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.
स्वदेशी बियाणे हे स्थानिक कृषीविषयक परिस्थितीना चांगले अनुकूल असतात कीड, रोग आणि दुष्काळाचे प्रतिकारक मदत करणारे असतात. शेतकरी हाच बियाण्यांचा योग्य मालक आहे, तो बियाण्यांचा संरक्षक आहे. शेतकऱ्यांना पुरवठा साखळीत सक्रिय सहभाग करून घेण्यातच शेतकऱ्यांचे खरोखरचे सशक्तीकरण आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने भारतातील 22 राज्यांमधील नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये 2.2 दशलक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, जे हवामान प्रतिरोधक असून बहु-पीक वापरतात, म्हणून शेतकरी अद्यापही कमी पाऊस असूनही नफा कमावू शकतात आणि आर्थिक आणि भौतिक परस्पर तडजोड न करता प्रतिस्पर्धी उत्पन्न मिळवू शकतात. असे श्री. एस. आर. व्यंकटेश बोलत होते.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.