• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 13, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
January 25, 2019
in बातम्या
0
कृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती
Share on FacebookShare on WhatsApp

नागपूर:
शेती आणि कृषीला प्राधान्य देत मागील वर्षात विदर्भासह राज्यातील विविध विकास प्रकल्पांना गती दिली आहे. त्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासासह सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दै. तरूण भारतच्या वतीने आयोजित विदर्भ आणि परिसराचा सर्वांगीण विकास या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नरकेसरी प्रकाशन लिमिटेडचे प्रबंध संचालक धनंजय बापट, नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुहीकर, संपादक गजानन निमदेव उपस्थित होते. यावेळी तरुण भारतच्या नव्या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शेती आणि सिंचनावर अधिक लक्ष केंद्रित करीत असतानाच राज्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक प्रकल्प अवघ्या 4 वर्षात प्रगतीच्या मार्गावर आहेत, याची माहिती दिली. अमरावती येथे सुरू करण्यात आलेला टेक्सटाईल पार, विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीज दरात देण्यात असलेली सवलत, नागरिक-सरकार संबंध आणखी भक्कम करण्यासाठी डिजिटल उपाय आणि पर्यटन विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाज, राज्य आणि देशात घडत असलेल्या बदलांवर अशा चर्चासत्रांच्या माध्यमातून मंथन होते. या मंथनातून नक्कीच चांगल्या कल्पना मांडल्या जातात. गेल्या चार-साडेचार वर्षांत विदर्भ आणि राज्य पातळीवर विकासकामे झपाट्याने होत आहेत. विरोधी पक्षात असताना विदर्भातील विविध समस्या मांडायचो, त्या समस्यांची यादीच बनवली होती. त्याच्या ब्ल्यू प्रिंटचे काम मोठ्या ताकदीने केले. त्यामुळे आता त्याचे परिणाम विकासाच्या माध्यमातून दिसून येत आहेत.

शेती, उद्योगासह सर्वच क्षेत्रात मूल्यवर्धन करायचे असेल तर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असून शाश्वत शेती आणि सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ प्रकल्प सुरु करून चालत नाहीत तर ते पूर्णत्वास नेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगताना राज्य शासनाच्या गेल्या चार-साडेचार वर्षांत विदर्भासह राज्यातील जुन्या प्रकल्पांना फेरप्रशासकीय मान्यता दिली. ते आता पूर्णत्वास जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या चर्चासत्रात सांगितले. गडकरी यांनी केंद्र शासनाकडून भरघोस निधी मिळवून दिला. त्यामुळे विदर्भातील सर्वच 11 जिल्ह्यातील अर्धवट पडून असलेल्या प्रकल्पांचे काम सुरु केले. गेल्या वर्षभरात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामधून आता एक लाख हेक्टरवर सिंचन होत असून, भविष्यात त्या सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात शाश्वत शेतीच्या सिंचनासाठी राज्य शासनाने धडक सिंचन विहीर, मागेल त्याला शेततळे आदि योजना सुरु केल्या. त्याशिवाय पूर्व विदर्भातील शेतकर्‍यांना बोड्यासाठीही निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगून ते म्हणाले की खुल्या कॅनॉलऐवजी आता बंद पंपांमधून शेतीला पाणी नेण्याचे काम सुरु केला असून आहे. शेतीला कमी पाण्यातून जास्त उत्पादन मिळावे, यासाठी ठिबक सिंचनावर शेतकर्‍यांनी भर द्यावा. त्यासाठी शासन त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतमाल पिकवतो. मात्र त्याच्या मालाला पाहिजे तसा भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतमालावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विदर्भातील अमरावती येथे गेल्या वीस वर्षात प्रथमच इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क सुरु केला असून कापड आणि फॅशनेबल कपडे असा पक्का माल तयार करुन मार्केटमध्ये आणला जात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

तसेच मोर्शी येथे कोका कोला, पेप्सी, पतंजलीचे काम सुरु करत आहोत. त्यांच्या शीतपेयांमध्ये या भागात पिकणारा संत्रा, त्यातील पल्प वापरता येणार असल्यामुळे येथील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना योग्य भाव मिळेल. पूर्वीच्या तुलनेत आता या भागात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढत असून उद्योगांसाठी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपेक्षाही कमी दरात विजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लवकरच खनिकर्म विभागाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्वच भागात विकासकामे आणि उद्योगउभारणीवर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Giving speed to agriculture and irrigation sectorspeed of developmentकृषी व सिंचन क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे विकासाला गती
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

जायद सीजन में भिंडी की खेती 
शेती

जायद सीजन में भिंडी की खेती 

by Girish Khadke
March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे
अवजारे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

by Girish Khadke
March 12, 2021
लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

जायद सीजन में भिंडी की खेती 

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

March 12, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In