• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, January 17, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
December 12, 2018
in बातम्या
0
शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on WhatsApp

शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
विश्‍वास पाठक यांची माहिती
नवी दिल्ली / प्रतिनिधी
शेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग करित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या सूत्रधार कंपनीचे संचालक विशवास पाठक यांनी आज येथे दिली.

महाराष्ट्र सदनात ऊर्जा विभागाव्दारे केलेल्या कामांची माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विश्‍वास पाठक यांनी दिली. यावेळी महावितरणचे तांत्रिक संचालक दिनेशचंद्र साबू, दिल्लीतील ऊर्जा विभागाचे व्यवस्थापकिय संचालक प्रफुल्ल पाठक, ऊर्जामंत्र्यांचे जनसंपर्क सल्लागार विवेक जोशी उपस्थित होते.

यावेळी विश्‍वास पाठक यांनी सांगितले, महाराष्ट्र शासनाने शेतकरी हा केंद्रबिंदू ठरवून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या ऊर्जा विभागाच्या योजनांमार्फत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या राज्यातील शेतकर्‍यांना रात्री 8 तास विनाखंड वीज 1.50 रूपयें युनिटप्रमाणे उपलब्ध करून दिली जात आहे. यासह सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार्‍या काळात दिवसा 3 रूपयें युनिटप्रमाणे वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना पैसे भरूनही विजेचे जोडणी मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांच्या असायच्या, विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांची कृषीपंपाच्या जोडणी संदर्भात अधिक तक्रारी होत्या. हे लक्षात घेता, राज्याच्या ऊर्जा विभागाने कृषीपंपाच्या जोडणीचा अनुशेष भरून काढला आणि दरवर्षी सव्वा लाख कृषी पंपांना जोडणी दिली. आतापर्यंत 5 लाख कृषी पंपांना जोडणी दिलेली आहे. अजूनही काही प्रलंबित शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) जोडणी दिले जात आहेत. यात एक किंवा दोन शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर वापरतील, यामुळे वीजचोरीवर आळा बसेल आणि शेतकर्‍याला पूर्ण दाबाने शाश्‍वत वीज मिळणार आहे. ऊर्जा विभागाने घेतलेला हा या वर्षातील मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय ठरला असल्याचे पाठक यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच सौभाग्य योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या आर्थिक सहयोगाचा फायदा दुर्गम भागातील नागरिकांना देण्यात येत आहे. गडचिरोली आणि नंदूरबार या जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील काही भागात अजून वीजपुरवठ्याची कामे सुरु आहेत. ही कामे डिसेंबरपर्यंत ती पूर्ण होतील आणि हा भाग ही ऊर्जामय होईल, अशी अपेक्षा पाठक यांनी यावेळी व्यक्त केला.

वीजनिर्मिती क्षमतेत वाढ आणि भारनियमन मुक्त राज्य
मागील 4 वर्षाच्या काळात महानिर्मितीची सुमारे 3360 मेगावॉट वीजनिर्मितीच्या क्षमतेतवाढ झाली आहे. यासोबतच अनेक वीज खरेदीच्या करारांमुळे मागणीएवढी वीज उपलब्ध झाली आणि राज्य भारनियमन मुक्त होण्यास मदत मिळाली. गुणवत्तापूर्ण कोळसा खरेदी, कोळसा वाहतूक, टोलिंग धोरण अशा अनेक निर्णयामुळे ऊर्जा विभागाने सुमारे एक हजार कोटींची बचत 4 वर्षात करून दाखविली. त्याचा फायदा वीजदर नियंत्रणात ठेवण्यासाठी झाला.

पारेषणच्या 6700 किमी वाहिन्या
गेल्या 4 वर्षात महापारेषणचे राज्यातील वीज वाहिन्यांचे जाळे प्रचंड सक्षम झालेले आहे. 6700 किलोमीटर हे जाळे पसरले असून 4 वर्षात 81 अतिउच्च दाबाची केंद्र निर्माण करण्यात आली. यामुळे 13 हजार 450 एमव्हीएची भर पडली. याचाच परिणाम असा की 22 ऑक्टोबर 2018 रोजी राज्याची 25 हजार मेगावॉट ही अचानक वाढलेली विजेची मागणी कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण करणे शक्य झाले. हा राज्यातील सर्वाधिक मागणीचा दिवस ठरला असून यात राज्यातील ऊर्जा विभागाची यशस्विता सिद्ध झाली.

सौर ऊर्जा निर्मितीला चालना
आगामी काळ सौर ऊर्जेचा असून सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घेऊन शासनाने व ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेला चालना देण्याचे धोरण आखले आहे. शेतकर्‍यांची दिवसा विजेची मागणी लक्षात घेता राज्यातील 45 लाख शेतकर्‍यांना आगामी काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणून 11 किलो वॅटच्या माध्यमातून सौर ऊर्जा शेतकर्यांना देण्यात येणार आहे.

राज्यात या योजनेचे 4 पथदर्शी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील मोहदी,नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, खापा आणि अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे सुरु झाले असून त्याचा फायदा शेतकर्यांना मिळत आहे. याशिवाय रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून शासकीय कार्यालये, शाळा, पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, घरगुती वापरासाठी लागणारी वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्मिती करणे सुरु झाले आहे.याशिवाय 1000 मेगावॉटचे ऊर्जा संवर्धन धोरण, ग्राम विद्युत व्यवस्थापक, दीनदयाल योजना, आयपीडीएस-2, उद्योगांना वीजदरात सवलत, लोक वस्त्यांना 100 टक्के विद्युतीकरण, ऑनलाईन वीजबिल प्रक्रिया, इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल, एमओडी असे अनेक ग्राहकोपयोगी निर्णय ऊर्जा विभागाने घेतले असल्याकडे विश्‍वास पाठक यांनी यावेळी लक्ष वेधले.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Efforts to give farmers the benefit of energy schemes by setting a point of viewशेतकर्‍यांना केंद्रबिंदू ठरवून ऊर्जा योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In