• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, January 18, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home बातम्या

राज्याच्या विकासात कृषी विभागाचा मोलाचा वाटा

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
January 17, 2019
in बातम्या
0
राज्याच्या विकासात कृषी विभागाचा मोलाचा वाटा
Share on FacebookShare on WhatsApp

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांची माहिती
कोल्हापूर :
राज्य शासनाने शेती आणि शेतकर्‍यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य दिले असून राज्याच्या विकासात कृषी विभागाचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोदगार कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे बोलतांना काढले.  येथील पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित केलेल्या तरंग राज्यस्तरीय कृषी कला-क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, निविष्ठा व गुणनियंत्रणचे संचालक विजयकुमार इंगळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व भारतीय कबड्डी संघाचे तुषार पाटील यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषी विभाग कृषी कर्मचार्‍यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे हित जोपासत असल्याने सांगून कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, कृषी विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी कल्याण निधीसाठी शासन सकात्मक असून अधिकारी-कर्मचार्‍याच्या अडीअडचणी आणि प्रश्‍न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील. कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात कृषी कर्मचार्‍यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
तरंग राज्यस्तरीय कृषी कला, क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कला-गुणांना निश्‍चितपणे वाव मिळणार असून यापुढील काळात कृषी विभागातील कर्मचार्‍यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून खेळाडू कर्मचार्‍यांचा गौरव करण्याचा मानस असल्याचेही कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांच्या तात्काळ निराकरणासाठी कृषी विभाग सज्ज आणि सजग असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी कृषी आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह म्हणाले की, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी मातीशी असलेलं नातं अधिक जिद्द आणि कष्टाद्वारे भक्कम करावे. याद्वारे शासन शेतकर्‍यांसाठी राबवित असलेल्या योजना आणि उपक्रम अधिक प्रभावीपणे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यात सक्रीया व्हावे, असे आवाहनही केले. या स्पर्धेतील सहभागी अधिकारी, कर्मचार्‍यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून तरंग राज्यस्तरीय कृषी कला-क्रीडा महोत्सव 13 जानेवारी 2019 पर्यंत आयोजित करण्यात आला असून यामध्ये राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमधील तसेच कृषी आयुक्तालय स्तरावरील 1397 पुरुष खेळाडू तर 393 महिला खेळाडू असे 1790 पुरूष व महिला खेळाडू सहभागी झाले आहेत. या महोत्सवामध्ये 12 खेळ प्रकारांचा समावेश असून यामध्ये क्रिकेट, हॉलिबॉल, खो-खो, कबड्डी, 4 बाय 100 रिले, गोळाफेक, धावणे, लांबउडी, टेबल टेनिस, बुध्दिबळ, बॅडमिंटन आदी खेळ प्रकारांचा समावेश आहे.
याप्रसंगी कृषी संचालक विजयकुमार इंगळे, कृषिसंचालक प्रल्हाद पोकळे, राष्ट्रकुल कुस्ती सुवर्णपदक विजेते राम सारंग व राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तुषार पाटील आदि मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन खेळाडू अधिकारी-कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व खेळाडूंनी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या रांगड्या शेतकरी कला आणि क्रीडा क्षेत्राला साजेशा संचलनाबरोबरच यवतमाळ, गडचिरोली आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा प्रकारात निवड झालेल्या कृषी विभागातील खेळाडूंचा तसेच त्यांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास आत्माचे संचालक अनिल बनसोडे, मृदसंधारण संचालक डॉ. के.पी.माते, निवृतत कृषि संचालक मुधकर घाग, तसेच राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव, कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या महोत्सवासाठी तमदलगे येथील 108 शेतकरी समुहाच्या संजीवनी ग्रो प्रोड्यूसर कंपनीने 400 डझन केली खेळाडूंना उपलब्ध करुन दिली.

शेवटी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सुरुवातीला कला व क्रीडा महोत्सवात सहभागी पथकांचे संचलनाने पाहुण्यांचा मानवंदना देण्यात आली.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Tags: Agriculture Department's contribution in the development of the stateराज्याच्या विकासात कृषी विभागाचा मोलाचा वाटा
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

sonia-gandhi
बातम्या

कृषी कायद्यासाठी पर्यायी कायदे तयार करा

September 30, 2020
राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी
बातम्या

राज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी

July 26, 2020
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा
बातम्या

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

May 10, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In