• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 3, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home यशोगाथा

पुन्हा आत्महत्यांच्या दिशेने?

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
October 8, 2018
in यशोगाथा, कायदा
2
पुन्हा आत्महत्यांच्या दिशेने?
Share on FacebookShare on WhatsApp
राज्यात आधीचे कर्जही माफ झालेले नाही आणि नवे कर्जही मिळत नसल्याने कोंडीत सापडलेल्या 1715 शेतकर्‍यांनी वर्षभरात आत्महत्या केल्याचे शेतकरी चळवळीतील नेत्यांचे म्हणणे आहेे. 89 लाख शेतकर्‍यांच्या 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची सरकारी घोषणा होती मात्र, प्रत्यक्षात 39 लाख शेतकर्‍यांना केवळ 17 हजार कोटी रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाली.  शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाला आहे तर त्यांना खरिपासाठी कर्ज देण्यास टाळाटाळ का केली जात आहे? सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी 54 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका शेतकर्‍यांना कर्जच देत नसल्यामुळे शेतकर्‍यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही.  जिल्हा बँकांच्या नाड़या सरकारनेच आवळल्यामुळे त्यांचीही अवस्था वाईट आहे. जिल्हा बँकांची अवस्था सरकारनेच दयनीय करून ठेवल्यामुळे 60 टक्के शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.सरकारची कर्जवाटपाची आकडेवारी फसवी असून लाखो शेतकरी कर्जापासून वंचित आहेत, असा आरोप शेतकरी चळवळीतून केला जातो आहे. गोलमाल उत्तरे देणारे राजकारणी व सत्ताधारी या आरोपाचेे समर्पक उत्तर देण्याचे धाडस अद्यापही करू शकलेले नाहीत; यातूनच त्यांची दानत स्पष्ट झालेली आहे. त्यामुळेच सरकारकडून शेतकर्‍यांची होणारी फसवणूक चव्हाट़यावर आणण्यासाठी शेतकरी आंदोलन पुन्हा जोर धरण्याचे संकेत आहेत. अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि त्याचा पिकांवर झालेला परिणाम यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे. राज्यातील 12 जिल्ह़्यांतील 170 तालुक्यांत सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागांतील पिकेही धोक्यात आहेत ,अशा नोंदी सरकारी कागदांवर असल्या तरी यंदाच्या खरीपाने कोरडवाहू शेतकरी पुन्हा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे , हे जळजळीत वास्तव आहे. ही जळजळीत वास्तवाची नोंद सरकारी कागदांवर दिसत नाही म्हणूनही सरकार आणि पुढार्‍यंच्या दानतीवर आता शेतकरी विश्वास ठेवायला  तयार नाही. राज्यात गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाला होता. गेल्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र परिस्थिती विपरीत आहे. सुरुवातीस राज्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने नंतर  दडी मारल्याने यंदा पुन्हा एकदा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर अखेर राज्यात सरासरीच्या 77  टक्के  व 170 तालुक्यांत 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. धरणांमधील एकूण पाणीसाठा 26 हजार 736 दशलक्ष घनमीटर असून तो प्रकल्पीय साठ़याच्या 65.48 टक्के आहे. पुढे दिवस निवडणुकांचे आहेत. त्यामुळे राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीचा अहवाल तयार करून , पाहणी करून दुष्काळ जाहीर करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. ज्या सरकारला कर्जमाफीची अंमलबजावणी प्रभावीपणे करता आलेली नाही, सर्वोच्च अधिकार वापरून राष्ट्रीयकृत बँकांच्या मुजोरीला चाप लावत त्यांना कोरडवाहू शेतकर्‍यांना कर्जे देण्यास भाग पाडता आलेले नाही; त्या सरकारकडून कोणत्या अपेक्षा या दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्याबद्दल करायच्या?; असा थेट प्रश्न आताच शेतकरी चळवळ विचारते आहे. खरा धोका निवडणुकीतील धामधुमीचा आहे. शेतकरी आंदोलन तीव्र होऊ नये म्हणून सत्ताधार्‍यांच्या बगलबच्च्यांची फौजही कामाला लागलेली आहे. शेतकरी आंदोलनात काहीही करून फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. या चळवळीतील प्रभावी नेत्यांना पिथवून ऐनवेळी त्यांच्या असंतोषाची धार कमी करीत शेतकरी आंदोलनच निष्प्रभ करण्याचेही प्रयत्न या बगलबच्च्यांकडून केले जाऊ शकतात.  शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून सर्वसामान्य माणसांमधील नाराजीची तीव्रता वाढू नये म्हणून त्यांचे लक्ष विचलित करणारे नवे मुद्दे अनपेक्षितपणे लोकांच्या माथी मारून त्यांना त्यातच गुंतवून ठेवले जाऊ शकते. मराठवाडा जवळपास सात वर्षांपासून नापिकीच्या यातना भोगतो आहे. ही तीव्रता सतत वाढते आहे.  आतबट्ट्याची होत असलेेली शेती वाचवण्यासाठी फक्त यंदाच्या वर्षी दुष्काळ जाहीर करून परिस्थिती सुधारणार नाही. प्रदीर्घ; कालावधीच्या सरकारी सहभागाची व गुंतवणुकीची मराठवाड्यातील शेतीला व शेतकर्‍यांना गरज आहे. मात्र गेल्या सात वर्षांतील व कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील सरकारची भूमिका पाहिल्यावर चित्र आशादायक आहे असे कुणीही म्हणणार नाही. म्हणजे यंदा पासून पुढे पुन्हा मराठवाडयाची वाटचाल हजारो आत्महत्यांच्या दिशेनेच जाणार आहे का?, हा खरा शेतकरी चळवळीचा व्यवस्थेलाच प्रश्न आहे. राज्यकर्त्यांचे शेतकर्‍यांना भुलवणे व झुलवणे असेच चालू राहील्यास शेतीतलील प्रगतीपेक्षा आहे त्या वस्तुस्थितीतूनच मार्ग काढणे दिवसेंदिवस अवघड होत जाणार आहे.  दुष्काळच यंदा निवडणुकीचा मुद्दा बनवून नेहमीचे किळसवाणे राजकारण होण्याचाही धोका आहे.

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 https://whatsapp.heeraagro.com//

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Tags: Again suicides ?पुन्हा आत्महत्यांच्या दिशेने?
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन
बातम्या

खाऱ्या पाण्यावर घेणार वेली टोमॅटोचे उत्पादन

July 2, 2019
माहिती मृत्युपत्राचा कायदा
कायदा

माहिती मृत्युपत्राचा कायदा

February 24, 2019
अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न
यशोगाथा

अर्थव्यवस्थेसमोरचा यक्ष प्रश्‍न

December 18, 2018

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In